Ganeshprasad Gogate
दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान 10 ते 30 मिनिटं झोप घेतल्यास ती जास्त उपयुक्त ठरते.
दुपारी 60 मिनिटं झोप घेतल्यास, शिकलेल्या ताज्या ताज्या गोष्टींचं स्मृतीत रुपांतर होतं आणि त्या मेंदूत साठवल्या जातात.
20 ते 30 मिनिटं झोप घेतल्यानं अन्नपचनास मदत होते आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसंच हृदयाचे ठोकेही नियंत्रित होतात.
दुपारच्या झोपेनंतर मनाची आनंदीवृती वाढते, कामासाठी लागणारा उत्साह येतो, जोम, तरतरी तसंच उत्पादन क्षमताही वाढते.
दुपारच्या झोपेनंतर चिंता, चिडचिडेपणा, मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कमी होतो.
साधारणतः 20 ते 30 मिनिटं झोपून उठल्यावर सतर्कता वाढते आणि दिवसाच्या उर्वरित भागातील आव्हानं पेलताना मनोभूमिका सकारात्मक राहते.