Pranali Kodre
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रिकेट प्रकारात शतक करणे मोठी कामगिरी मानली जाते.
त्यातही तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये करण्याचा कारनामा काही मोजक्या क्रिकेटपटूंनाच करता आला आहे.
भारताचे असे पाच खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात किमान एक शतक केले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध १ फेब्रुवारी २०२३ रोजी अहमदाबादला झालेल्या टी२० सामन्यात शुभमन गिलने १२६ धावांची नाबाद खेळी केली.
त्यामुळे शुभमन गिल तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला होता.
गिलने वनडेत 4, कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत प्रत्येकी १ शतक केले आहे.
भारताकडून सर्वात पहिल्यांदा तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करण्याची कामगिरी सुरेश रैनाने केली होती.
रैनाने वनडेत 5, कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी 1 शतक केले आहे.
तसेच रैनानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करण्याचा पराक्रम केला होता.
रोहितने आत्तापर्यंत वनडेत ३० शतके, कसोटीत ८ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ शतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करण्याच्या यादीत केएल राहुल देखील आहे.
केएल राहुलने आजपर्यंत कसोटीत ७ शतके, वनडेत ५ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २ शतके केली आहेत.
त्याचबरोबर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा चौथा क्रिकेटपटू आहे.
विराटने कसोटीत 27 शतके, वनडेत ४६ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १ शतक केले आहे.