गोव्यातील 'या' गावात कोंबडी पाळत नाहीत; जाणून घ्या कारण...

Akshay Nirmale

गोव्यातील शिरगावात लईराई जत्रोत्सवाला 24 एप्रिलपासून सुरवात झाली आहे. या शिरगावात काही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पाळल्या जात आहेत.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

या जत्रोत्सवात धोंड हे भक्तगण घरापासून लांब राहतात. त्यांनी छताखाली राहू नये, असा संकेत आहे.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

कोंबडी ही खूप घाण करते. इतस्ततः तिची विष्ठा पडलेली असती. तीचा स्पर्श या धोंडांना होता कामा नये, असा संकेत आहे.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

त्यामुळेच या गावात कोंबडीच पाळली जात नाही. यासह इतरही काही परंपरा पाळल्या जातात.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

हे धोंड या जत्रोत्सवापुर्वी घराबाहेर राहायला जातात. ते छताखाली राहत नाहीत. ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

जत्रोत्सवात हे धोंड भक्तगण जळत्या निखाऱ्यांवरून पळतात. जर वरील परंपरा पाळल्या नाहीत तर धोंड भक्तगणांना निखाऱ्यांचे चटके बसतात, अशी श्रद्धा आहे.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak

त्यामुळेच या गावात कोंबडी न पाळण्यासह विविध प्रथा, परंपरांचे येथे पालन वर्षानुवर्षे केले जात आहे. दरम्यान, शिरगावसह इतरही अनेक गावांमध्ये धोंड या विविध व्रतांचे पालन करत असतात.

Lairai Jatrotsav Goa | Dainik Gomantak
Panaji City | Dainik Gomantak