Pramod Yadav
गोव्यातील प्रसिद्ध कार्निव्हला 18 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, 21 रोजी याची सांगता होणार आहे.
दरवर्षी या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहली जाते, पण यावेळी कार्निव्हलवरून गोव्यात वाद होताना दिसत आहे.
कार्निव्हलच्या दिवशीच गोव्यात बाबा रामदेव यांचे योग शिबिर सुरू झाले. याच्या वेळेबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केला.
यावरून विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकार कार्निव्हलचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केला.
तसेच, सरकारने याकाळात होणाऱ्या इतर कार्यक्रम आणि मिनी कार्निव्हलची परवानगी देखील नाकारली.
फोंड्यात चित्ररथांना परवानगी नाकारण्यात आली, त्यावरून विजय सरदेसाई यांनी कार्निव्हल अचानक अप्रिय का वाटू लागला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तसेच, गोवा आरएसएसचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी देखील कार्निव्हलवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.