
Modi Government: 2014 पासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अनेक योजना सुरु केल्या. या योजनांच्या माध्यमातून लोकांना भरपूर लाभ देण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे, जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण प्रदान करते.
बचत बँक किंवा पोस्ट ऑफिस (Post Office) खाते असलेल्या 18-70 वयोगटातील व्यक्तींना या योजनेंतर्गत नोंदणी करण्याचा अधिकार आहे.
अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी या योजनेत 2 लाख रुपयांचे अपघाती मृत्यू आणि अपंगत्व कवच (अंशिक अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख रुपये) उपलब्ध आहे.
मोदी सरकारने जानेवारी 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरु केला होता. स्टार्टअप इंडिया लाँच करण्याचा उद्देश देशातील इनोवेशन आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हा होता, ज्यामुळे आर्थिक वाढ होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
या उपक्रमाद्वारे, स्टार्टअप्संना इनोवेशन आणि डिझाइनद्वारे विकसित करण्यासाठी सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
PM-KISAN ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी 2019 मध्ये जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आली होती.
थेट लाभ हस्तांतरण (DBT) मोडद्वारे देशभरातील शेतकरी (Farmer) कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6000 रुपयांचा आर्थिक लाभ हस्तांतरित केला जातो.
ही योजना सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी (SMF) होती, परंतु नंतर योजनेची व्याप्ती सर्व जमीनधारक शेतकर्यांसाठी वाढवण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.