पणजी: सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 दिवसांचे घ्यावे. त्याच अधिवेशनात चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर करावा. लेखानुदान घेऊ नये. कारण गेल्या वर्षी लेखानुदान घेतले, पण वर्षभरात जेमतेम आठ दिवसच विधानसभा कामकाज चालले होते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मागील अधिवेशनावेळी पुढील अधिवेशन 20 दिवसांचे तरी घ्या, असे सुचवले होते. आता तो विषय यावेळी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. हे अधिवेशन आठवडाभराचे असले तरी प्रत्यक्षात कामकाज तीनच दिवस चालेल.
पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असल्याने त्यादिवशीच्या कामकाजावर मर्यादा असतात. जनता विरोध करत असलेल्या प्रकल्पांबाबत आमदार विजय सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा खासगी ठराव कामकाजात दाखल झाला आहे, तर फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील एका प्रेक्षागारास माजी क्रीडामंत्री फ्रान्सिस मोंत क्रुझ यांचे नाव द्यावे, हा माझा ठराव दाखल करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.