१२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष गाड्या धावणार

Eighty more trains will run
Eighty more trains will run

नवी दिल्ली: कोरोनामुळे थांबलेली रेल्वेची चाके पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे आहेत. येत्या १२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष गाड्या धावणार असून, यासाठी आरक्षणाची प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी केली आहे. राज्यांच्या मागणीनुसार परीक्षांसाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ज्यादा गाडा सोडण्याची मागणी करण्यात आल्यास आम्ही त्याला देखील परवानगी देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 विशेष म्हणजे नव्या यादीत महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ दोन गाड्या आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना नंतर जारी केली जाईल असे सांगून यादव म्हणाले की, ‘‘ कोरोना काळात सुरू असलेल्या आधीच्या २३० गाड्यांच्या व्यतिरिक्त या ८० गाड्या (४० जोड्या) असतील. सध्या ज्या गाड्या धावत आहेत त्यांचा आढावा घेऊन ज्या मार्गांवर जास्त प्रतीक्षा यादी आहे त्या स्थानकांसाठी मूळ गाडीच्या पाठोपाठ आणखी एक गाडी (क्‍लोन ट्रेन) सोडली जाणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com