9 Years of Modi Government: 'नोटाबंदी, कलम 370, बालाकोट...', 9 वर्षातील मोदी सरकारचे मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

9 Years of Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) आपल्या कार्यकाळाची 9 वर्षे पूर्ण करत आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

9 Years of Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) आपल्या कार्यकाळाची 9 वर्षे पूर्ण करत आहेत. 9 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

या 9 वर्षात पंतप्रधान मोदींनी असे अनेक निर्णय घेतले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला तर मग जाणून घेऊया ते धक्कादायक निर्णय...

कलम 370 हटवले

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हे सरकारचे सर्वात मोठे यश आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश कलमे रद्द करण्यात आली.

यासह देशातील ते सर्व कायदे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आले, जे 70 वर्षांपासून लागू होऊ शकले नाहीत. तेथील लोकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळू लागला.

Prime Minister Narendra Modi
PM Security: PM मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल, ADG घेणार पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी!

तीन तलाक

30 जुलै 2019 रोजी सरकारने (Government) तीन तलाक विधेयक मंजूर केले. यानंतर तीन तलाक देणे गुन्ह्याच्या श्रेणीत आले.

बालाकोट एअर स्ट्राइक

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

दहशतवाद्यांच्या (Terrorists) या घृणास्पद कृत्याचा बदला म्हणून दोन आठवड्यांनंतर, 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केली, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Prime Minister Narendra Modi
NIA चा मोठा खुलासा, PM मोदींच्या काश्मीर दौऱ्यात मसूद अझहरने रचला होता कट

जीएसटी लागू करण्याचा निर्णय

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी लागू केला. देशात एक देश, एक कर प्रणाली लागू करणे हा त्यांचा उद्देश होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सेवा कर, व्हॅट आणि इतर अनेक कर रद्द करण्यात आले.

नोटाबंदी

2016 मध्ये मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने हा मोठा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे ब्लॅक मनी असणाऱ्यांना मोठा बसला.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कुचराई... अनुपम खेरांनी चन्नी सरकारवर साधला निशाणा

नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक 11 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले. याअंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि पारशी धर्मातील निर्वासितांना देशाचे नागरिकत्व दिले जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 डिसेंबर रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.

2000 च्या नोटांवर बंदी

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मे 2023 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सरकारने 1000 ऐवजी 2000 च्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com