कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा विस्कळीत

Amit Shah should intervene in railway issues says Punjab Chief Minister Amarinder Singh
Amit Shah should intervene in railway issues says Punjab Chief Minister Amarinder Singh

चंदीगढ : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. मालगाड्यांची सेवा सुरळीत व सुरक्षित सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मालगाड्या व प्रवासी गाड्या अशा दोन्ही सेवा सुरू राहतील किंवा कोणतीच नाही, असा निर्णय रेल्वेने शनिवारी घेतला. 24 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वेने पंजाबमधील सेवा स्थगित केली आहे. 21 ऑक्टोबर रोजी मालगाड्या सोडण्यात आल्या, पण शेतकऱ्यांनी त्या अडवल्या.

अमरिंदर यांनी सांगितले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या नाही. सर्व रेल्वेमार्ग पूर्ववत करण्यात आले असून तेथे शेतकऱ्यांच्या कोणत्याही हालचाली होत नाहीत. पंजाब तसेच शेजारच्या राज्यांतील पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नुकसान होत 
आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com