कॉंग्रेसने खरचं राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा चुकीचा फोटो शेअर केला? वाचा काय आहे सत्य

JP Nadda: इंग्रज जेव्हा आपल्या देशात आले तेव्हा ते सिंधू खोऱ्याला इंडस खोरे म्हणायला लागले. त्या आधारावर त्यांनी देशाचे नाव इंडिया असे ठेवले.
BJP National President JP Nadda slams Congress.
BJP National President JP Nadda slams Congress.Dainik Gomantak

BJP National President JP Nadda slams Congress for sharing wrong photo of Preamble of Indian Constitution on Twitter: भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा चुकीचा फोटो ट्विटरवर शेअर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले.

जो पक्ष देशाची प्रस्तावनाही वाचत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येतील. असे म्हणत नड्डा यांना कॉंग्रेसवर टीका केली.

“ज्या पक्षाला भारताची प्रस्तावनाही माहीत नाही अशा पक्षाकडून आपण काही अपेक्षा करू शकतो का? काँग्रेसला संविधान आणि डॉ. आंबेडकरांचा आदर नाही,” असे म्हणत नड्डा यांनी कॉंग्रेसने ट्विट केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेवर उत्तर दिले.

यूजर्सनी नड्डा यांना झोडपले

असे असले तरी कॉंग्रेसने ट्विट केलेला भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा फोटोमध्ये शुद्धलेखनाच्या कोणत्याही चुका नाहीत असा दावा अनेकजन करत आहेत.

यावेळी राजेश ग्रिगलानी नावाच्या यूजरने जेपी नड्डा यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले, "कॉंग्रेसने पोस्ट केलेला भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा हा फोटो खरा आहे. ट्रोलर्स असे करू शकतात. पण, एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्षही ट्रोलर्सची कामं करत असेल तर हे लज्जास्पद आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात INDIA चे अधिकृत नाव भारत करण्याचा ठराव होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत, भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद केले आहे- INDIA, म्हणजेच भारत, राज्यांचे संघराज्य असेल. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या विशेष सत्रादरम्यान यात दुरुस्ती केली जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी, या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन प्राप्त झालेले नाही.

दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या भाजप विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला घाबरल्यामुळे सत्ताधारी पक्षाने देशाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला. त्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

सध्या वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतांवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आणि म्हणाले, “श्री. मोदी इतिहासाचे विकृतीकरण करून भारताचे विभाजन करू शकता."

कसे पडले इंडिया नाव?

इंग्रज जेव्हा आपल्या देशात आले तेव्हा ते सिंधू खोऱ्याला इंडस खोरे म्हणायला लागले. त्या आधारावर त्यांनी देशाचे नाव INDIA असे ठेवले. भारत किंवा हिंदुस्थान म्हणणे कठीण होते आणि इंडिया म्हणणे खूप सोपे होते. तेव्हापासून भारताला इंडिया म्हटले जाऊ लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com