देशातील तीन राज्यांमध्ये कर्फ्यू लागू ..!

Curfew has been announce in the three states of India due corona including Gujarat Rajasthan and Madhya Pradesh
Curfew has been announce in the three states of India due corona including Gujarat Rajasthan and Madhya Pradesh

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत, देशातील तान राज्यांनी काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा समावेश आहे.

मध्य प्रदेश - मध्य प्रदेश सरकारने शुक्रवारी इंदूर, भोपाळ, ग्वालियर, रतलाम आणि विदिशा या पाच शहरांमध्ये शनिवारी रात्री कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. एक आदेश जारी करताना राज्य सरकारने सांगितले की रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू लागू होईल. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासकरुन इंदूर आणि भोपाळमधील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीनंतर च्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत चौहान यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची योजना आखण्याची योजना आखल्याचे वृत्त फेटाळून लावले.

गुजरात - गुजरात सरकारने शुक्रवारी कडक पावले उचलत आणि शनिवारपासून सूरत, वडोदरा आणि राजकोट या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादमध्ये काल रात्री 9 वाजल्यापासून ते 23 नोव्हेंबरला सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू असा 51 तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी गेल्या 24 तासांत एकट्या अहमदाबाद शहरात कोरोना संसर्गाची 305 प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर सुरत शहरात 205, वडोदरामध्ये 116 आणि राजकोट शहरात 83 नवीन रूग्ण सापडले.

राजस्थान - कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राजस्थान सरकारने राज्यात शनिवारपासून कलम 144 अन्वये निर्बंध लादले जातील, अशी घोषणा शुक्रवारी केली. आदेशाची घोषणा करताना अशोक गहलोत सरकारने सांगितले की, राजस्थानातील सर्व जिल्ह्यांमध्ये कलम 144 ची अंमलबजावणी करण्याकरिता सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतरच जिल्हा दंडाधिकारी अधिक कालावधीसाठी कलम 144 लागू करू शकतात, असे या आदेशात नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींनी लसीकरणाच्या धोरणाचा आढावा घेतला - कोरोनाच्या या गंभीर टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताच्या लसीकरण धोरणाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली ज्यात लोकसंख्येचे प्राधान्यक्रम आणि कोरोनची लसी आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग या मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्विटरवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की , "या बैठकीत लस नियामन मान्यता आणि खरेदी या संबंधी महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली."

अधिक वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com