पाटणा- मागील महिन्यापासून तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर अनेक राजकीय विश्लेषण करणाऱ्या कंपन्यांनी तसेच विविध संस्था आणि वाहिन्यांनी कल दिले होते. हे कल आता खोटे ठरताना दिसून येत आहेत. एनडीएने बहुमतापेक्षा जास्त आघाडी घेतल्याने राजद सत्ता स्थापन करू शकेल असे भाकित वर्तवणाऱ्या अनेक वाहिन्यांचे अंदाज खोटे ठरलेले असल्याचे चित्र आहे.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीत दुपारपर्यंतच्या कलांनुसार अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मतमोजणीला सुरूवात झाल्यावर राजद आणि कॉंग्रेस यांचे महागठबंधन बऱ्याच जागी पुढे होते. वाहिन्यांनी वर्तविलेल्या भाकितानुसार त्यांना कदाचित आज पूर्ण बहुमत मिळेल अशी आशा होती. मात्र, एनडीएने जोरदार मुसंडी मारत आता स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. ताज्या निवडणूक मतमोजणीनुसार, राजद ६३ तर कॉंग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे ७६ उमेदवार आता आघाडीवर दिसून येत असून मित्रपक्ष जदयूचे ५० उमेदवार आघाडीवर आहेत. लोकजनशक्ती पक्षही ३ जागांवर आघाडीवर आहे.
आपली शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन नितीश कुमार यांनी प्रचारादरम्यान केले होते. तर रोजगाराच्या नावावर तेजस्वी आपली निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत १ कोटी मतदारांची मतमोजणी झाली असून अजूनही ३ कोटी मतदारांचा कल स्पष्ट व्हायचा आहे.
काही प्रमुख माध्यम संस्थांचे एक्झिट पोल-
सद्यस्थितीत बिहारमध्ये चित्र एक्झिट पोलच्या बरोबर विरूद्ध दिसत असून रात्री उशिरापर्यंत निवडणूक निकाल लागल्यावरच सर्व २४३ जागांवरील उमेदवारांचे भविष्य काय आहे ते कळू शकेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.