नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या सीमांवर आज सलग १९ व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची धग कायम होती. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी नेत्यांनी कायदा दुरुस्तीला पुन्हा स्पष्ट नकार दिला आहे.
किमान हमीभाव व बाजार समित्यांबद्दलच्या दुरुस्त्यांबरोबरच आता शेतकऱ्यांसाठी पॅन कार्डची नोंदणी करण्याची नवी दुरुस्ती कायद्यांत करण्यासही केंद्राने तयारी दाखविली आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी झालेल्या गुरमित सिंग या मोहालीतील शेतकऱ्याचा आज दुपारी मृत्यू झाला. आंदोलन सुरू असताना प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.