Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा संपूर्ण देशभर पायी चालत भारत जोडो यात्रोचा दौरा काही दिवसांपासून सुरु होता. आज काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप झाला आहे. शेर-ए- काश्मीर मैदानावर राहुल गांधींनी बर्फवृष्टी सुरु असतानादेखील भारत जोडो यात्रेच्या समारोपाचे भाषण राहुल गांधी करत होते.
भारत जोडो यात्रेसारखे मोठे काम मी आणि माझ्यासोबत ही यात्रा करणाऱ्यांनी स्वत:साठी किंवा कॉंग्रेससाठी केले नसून या देशाच्या जनतेसाठी केले आहे,असे राहुल गांधींनी म्हटले आहे. हे एक लहान पाऊल आहे, तिरस्काराच्या दुनियेत प्रेमाने आपले विचार मांडण्याचा छोटा प्रयत्न आहे.
त्याबरोबरच, माझ्या परिवाराने मला न भीता जगायला शिकवले आहे. मी हिंसा आणि अहिंसा दोन्ही बघितल्या आहेत. काश्मिरमध्ये आल्यानंतर मी पायी प्रवास करु नये असे अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,मी पायी चालत ही यात्रा केली तर मला ग्रेनेड चासामना करावालागू शकतो. मात्र मला विश्वास होता, माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग लाल होणार नाही. काश्मीरच्या लहानापासून बुजुर्गापर्यंत सगळ्यांनी माझे उत्तमप्रकारे स्वागत केले.
मला माहित होते हे असेच होणार होते.काश्मीरच्या लाल चौकात भारता( India)चे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर झेंडा फडकावणारे राहुल गांधी दुसरे नेते ठरले आहेत.
दरम्यान, मागच्या बऱ्याच दिवसांपासून राहुल गांधीची भारत जोडो यात्रा चर्चेत होती. तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र( Maharashtra) अशा 12 राज्य,145दिवस आणि 4080 किलोमीटरचा प्रवास करत आज काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा आज काश्मीरमध्ये समारोप झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.