
Indian Railway: भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. आज तंत्रज्ञानामुळे रेल्वेच्या तंत्रज्ञानामध्येही बदल झाले आहेत. मात्र, नीलगीरीमधील एक ट्रेन अशी आहे जिचा वेग अत्यंत कमी आहे.
देशातील लोकसंख्येचा मोठा भाग दररोज रेल्वेने प्रवास करतो. भारतात वंदे भारत, दुरांतो, राजधानी एक्स्प्रेस यासारख्या रेल्वे सुपरफास्ट रेल्वे म्हणून ओळखले जातात. भारताती( India )ल सर्वात कमी वेगाने चालणारी रेल्वेसुद्धा आहे. या ट्रेनचे नाव मेट्टापल्यम उटी नीलगिरी पॅसेंजर ट्रेन आहे. तिचा वेग ताशी 10 किलोमीटरपेक्षा कमी आहे. असे म्हटले जाते की, या रेल्वेचा वेग सायकलपेक्षाही कमी आहे. ही रेल्वे एक टॉय ट्रेन आहे.
महत्वाची बाब म्हणजे ,ही रेल्वे( Railway ) वाफेच्या इंजिनावर चालते. तमिळनाडू( Tamilnadu)च्या पहाडी प्रदेशात ही रेल्वे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते,असे तिथल्या स्थानिकांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वेला 46 किलोमीटरचे अंतर पार करायला पाच तासांचा वेळ लागतो. 46 किलोमीटरच्या प्रवासात रेल्वे अनेक ठिकाणांवर थांबते. या पहाडी रेल्वेची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली आहे..
एकीकडे नीलगीरी पॅसेंजर सर्वात कमी वेगासाठी ओळखली जाते. तिथे भारतात सर्वात जास्त वेगाने चालणाऱ्यासुद्धा काही रेल्वे आहेत. वंदे भारत ही ताशी 180 किलोमीटर धावते. तर शताब्दी एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर धावते. राजधानी एक्सप्रेससुद्धा ताशी140 किलोमीटर धावते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.