West Bengal Election 2021: हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांच्यावर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल  

Narendra Modi and Mamata Banerjee
Narendra Modi and Mamata Banerjee

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या कृष्णानगरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत आहेत. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणुकीच्या वेळेस झालेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र हल्ला चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचाराबद्दल बोलताना, केंद्रीय सुरक्षा दलाची समस्या नसल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केलेली विधाने यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (Narendra Modi's strong criticism of Mamata Banerjee over election violence)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना ममता बॅनर्जी या केंद्रीय सुरक्षा दलांना नावे ठेवत असल्याचे सांगितले. याशिवाय ईव्हीएमला  देखील त्या नवे ठेवत असून दीदीने आज आपल्याच पक्षाच्या पोलिंग एजंटांना नावे ठेवण्यास सुरवात केली असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच लोकशाहीच्या उत्सवातही दीदी माता-भगिनींच्या अश्रूंचे कारण बनत असल्याची टीका नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली. आणि ममता बॅनर्जी यांच्या गैरकारभारामुळेच  बंगालची अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे ते पुढे म्हणाले. 

याव्यतिरिक्त, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय सुरक्षा दले संपूर्ण देशभरात निवडणूक घेत असल्याचे नमूद करत या निवडणुका निष्पक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना उद्देशून हा 2021 चा बंगाल आहे. आणि त्यामुळे लोकशाहीशी खेळण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले. इतकेच नाही तर, ममता बॅनर्जी यांच्यावर जितके बंगालच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तितके लोक ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच, भारतीय जनता पक्षच (BJP) निवडणूक लढवत नसल्याचे नमूद करत, पश्चिम बंगाल मधील जनता ही निवडणूक लढवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय, भाजपाचे डबल इंजिन सरकार बंगालला एक नवीन राजकीय वातावरण देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर सरकारचा निर्णय हा सरकार घेणार असून तोलाबाजी करणाऱ्यांना स्थान देण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रशासन, पोलीस यांचे निर्णय देखील ते स्वतः घेतील. यात तोलाबाजी करणाऱ्यांना घुसखोरी करता येणार नसल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. शिवाय, यावेळी बैसाखच्या दिवशी येणाऱ्या वादळाने टीएमसी सरकार आणि त्याच्या गुंडांनाही धक्का बसणार असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com