पाटण्यात बळीराजाचा आक्रोश

Planning to take Mahamorcha tens of thousands of farmers in Patna
Planning to take Mahamorcha tens of thousands of farmers in Patna

पाटणा: पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान महासभा आणि डाव्या संघटनांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते. गांधी मैदानापासून राजभवनाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांना डाक बंगला परिसरामध्ये रोखून धरले होते. राजभवन येथून ४ किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून राजभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी 
झाले .

सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. राजभवनाच्या दिशेने जाणारा मार्च रोखणे हा देखील एक प्रकारचा अन्यायच आहे. आम्हाला राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यायचे होते, असे अखिल भारतीय किसान महासभेचे बिहारचे सचिव रामाधार सिंह यांनी सांगितले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com