नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय राऊत आज 1 वाजता गाझीपुर बॉर्डरवरील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.
"शेतकऱ्याना अत्यंत वाईट वागणूक मिळत आहे. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कोणाची परवानगीची गरज नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणखी किती त्रास देणार आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे", असे म्हणत मोदी सरकारला संजय राऊतांनी टोला लगावला. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. ठाकरे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्या सूचनेवरुन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भेट देणार आहेत. असे संजय राउत यांनी ट्विट केले आहे.
केंद्र सरकारच्या तीन नविन कृषी कायद्यांविरोधात हे शेतकरी एकवटले आहेत. यावर अजून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत तीन नवे कृषी कायदे रद्द करत नाहीत, तोपर्यत आंदोलनातून माघार घेणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. सरकार नवे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं सांगत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कायद्यांचं समर्थन केल्याचं ते सांगतात. पण हे फक्त आमचं आंदोलन कमकुवत करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत, असं शेतकरी नेते जोगिंदर सिंह यांनी सांगितलं.
आज गाझीपुर बॅार्डरवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी रस्त्यावर खिळे टाकले आहेत. पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.