काँग्रेसचे आता ‘शेतकऱ्यांसाठी बोला’

Withdraw farm bills, guarantee MSP: Rahul Gandhi tells government
Withdraw farm bills, guarantee MSP: Rahul Gandhi tells government

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांचा विरोध तीव्र करण्यासाठी कॉंग्रेसने आता ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ (शेतकऱ्यांसाठी बोला) ही मोहीम सोशल मीडियावर  सुरू केली असून पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी  काँग्रेसच्या  या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 

संसदेत कृषी सुधारणा विधेयकांना विरोध केल्यानंतर आता संसदेबाहेरही पक्षाची आक्रमकता कायम ठेवण्यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसच्या या मोहिमेकडे पाहिले जाते.  “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन विरोध करावा”, असे ट्विट करून राहुल गांधींनी आज या मोहिमेचा प्रारंभ केला.

या ट्विटसोबत जोडलेल्या मोहिमेशी संबंधित ध्वनिचित्रफितीमध्ये म्हटले आहे, की ‘‘ मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना बरबाद करणारी धोरणे राबवीत आहे. याआधी शेतकऱ्यांची जमीन बळकावणारा अध्यादेश आणला होता, तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने  शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार परत मिळवून दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या हितावर भाजप सरकारने हल्ला चढविला असून त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस  लढण्यासाठी तयार आहे. शेतकरी विरोधातील तिन्ही काळे कायदे मागे घेतले जावेत.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com