
Uttar Pradesh Woman leaves 4th husband and 3 children for fifth lover :
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याच्या तीन मुलांसह त्याला सोडून, प्रियकरासह पळून गेली आहे.
पतीने अशीही माहिती दिली की पत्नीशी लग्न करण्यापूर्वी तिचे तीनदा लग्न झाले होते. आता पती आरोप करत आहे की, आपल्या 'पाचव्या' प्रियकरासाठी पत्नीने त्याला आणि तीन मुलांना सोडून दिले आहे.
या सर्व प्रकारानंतर हा पीडित तरुण पत्नीच्या शोधात गोवोगावी सूचना फलक घेऊन वणवण फिरतोय. त्याच्या हातात असलेल्या या फलकावर 'बेपत्ता व्यक्तीचा शोध' असे लिहिलेला मजकूर पत्नीचा फोटो आहे.
अनिल राजभर नावाच्या या तरुणाने या घटनेनंतर प्रशासनाकडे मदत मागितली आहे. त्याच्या लग्नाची ही ऐकल्यानंतर प्रत्येकजण डोक्याला हात लावत आहे. या अनिलला त्याची पत्नी रीना चंदीगड, पंजाब येथे भेटली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले होते.
तरुणाने दावा केला की तो दहा वर्षांपूर्वी चंदीगडमध्ये रीनाला भेटला होता. त्यानंतर ते मित्र बनले होते. पुढे, मैत्री नात्यात फुलली आणि अनिल आणि रीनाने चंदीगडमध्ये लग्न केले.
लग्नानंतर अनिल आपल्या पत्नीसह त्याच्या गावी गेला आणि उत्तर प्रदेशातील आझमगड येथे स्थायिक झाला. त्यांने पोलिसांना सांगितले की ते नऊ वर्षांपासून एकत्र असून त्यांना तीन मुले आहेत. तो म्हणाला की त्यांच्यात सर्व काही ठीक होते, परंतु ती सतत कोणाशीतरी फोनवर बोलायची. शेवटी तीने प्रियकराच्या साथीने पळ काढला.
अनिलने पोलिसांना सांगितले की, रीना ३ जुलै रोजी प्रियकरासह पळून गेली. त्यांनी पोलिसांची मदत मागितली. मात्र, अद्यापपर्यंत या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांनाही अपयश आले आहे, असे वृत्तात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.