OIC Meeting: काश्मीर मुद्द्यावरून चीन, पाकिस्तानला भारताने सुनावले खडे बोल

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन मध्ये चीनने काश्मीरचा उल्लेख केल्याने त्यावरती भारताने आक्षेप घेतला आहे.
Organisation of Islamic Cooperation
Organisation of Islamic CooperationDainik Gomantak

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (Organisation of Islamic Cooperation) मध्ये चीनने (Chiana) काश्मीरचा (kashmir) उल्लेख केल्याने त्यावरती भारताने (India) आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, इस्लामाबादमध्ये ओआयसीच्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी ज्या पद्धतीने काश्मीरचा उल्लेख केला तो पूर्णपणे अनावश्यक होता. आम्ही ते नाकारतो. काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून त्यावर चीनसह तिसर्‍या कोणत्याही देशाने भाष्य करु नये आणि ते नाहक असल्याचे ही भारताने म्हटले आहे. (OIC Meeting India responds to China and Pakistan over Kashmir issue)

Organisation of Islamic Cooperation
अमेरिकेने भारताला दिली मोठी ऑफर, मोदी पुतीन बाबत कोणता घेणार निर्णय?

जगातील मुस्लिम देशांचा आवाज उठवण्यासाठी इस्लामिक सहकार्य संघटनेची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द राखून मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण करणे हा या संघटनेचा प्रथम उद्देश आहे. 22 आणि 23 मार्च रोजी इस्लामाबादमध्ये या 57 सदस्यीय मंडळाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले आहे. मंगळवारी उद्घाटनाच्या सत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी ओआयसीच्या मंचावरून काश्मीरचे सूर उमटवले आहेत. आपण दीड अब्ज मुस्लिम आहोत पण काश्मीर आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलो आहोत, असे इम्रान खान यावेळी म्हणाले होते. काश्मीरवर आमचा प्रभाव नाहीये. ते कधीही आम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा बेकायदेशीरपणे रद्द केला, पण त्याने काहीही झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

भारताने: काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे

या बैठकीत उपस्थित असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही काश्मीरचा रोखून उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “आम्ही पुन्हा काश्मीरवर आमच्या अनेक इस्लामिक मित्रांची हाक ऐकली आणि चीनलाही तीच अपेक्षा आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ओआयसीच्या उद्घाटन समारंभात केलेल्या भाषणात भारताला दिलेला संदर्भ अनावश्यक होता आणि आम्ही तो साफ नाकारतो. बागची म्हणाले की, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. चीनसह इतर देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाहीये. भारत त्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

Organisation of Islamic Cooperation
'...माफी मागा', जमैकामध्ये प्रिन्स विल्यम अन् केट मिडलटन यांचा होतोय विरोध

चीनचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावरती?

भारताचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा चीनचे परराष्ट्र मंत्री 24 मार्च रोजी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा रंगत आहे. युक्रेनवर (Ukraine) रशियाच्या (Russia) हल्ल्यावरून जगात निर्माण झालेल्या गदारोळात चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा संभाव्य दौरा होणार आहे. जगात फक्त चीन आणि भारत आहेत, जे उघडपणे रशियाविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. आणि त्यामुळे अमेरिका वगैरे देशांमध्येही तीव्र नाराजी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com