नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या हद्दीत चीनने शिरकाव करत चक्क गाव उभारलं आहे. हे गाव वसवल्याची माहीती सॅटलाइटच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आली आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चक्क मोदींना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली. चीननं अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागात गाव वसवलं आहे. चीनने तब्बल 101 घरांची वस्ती वसवली.
भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीननं बांधकाम केल्याचं समोर आलं आहे. राहुल गांधीनी चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली," मै देश झुकने नहीं दूंगा" या त्यांच्या वचनाची राहुल यांनी यावेळी आठवण करुन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. \Remember his promise- “मैं देश झुकने नहीं दूँगा।” pic.twitter.com/NdXT4hqkNK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 19, 2021
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.