Sri Lanka Crisis: राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतुन साजिथ प्रेमदासा यांची माघार घेतली

President: राष्ट्रपतीपदासाठी तीन उमेदवारांची घोषणा
Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisDainik Gomantak

सध्या श्रीलंका आर्थिक संकटाबरोबरच राजकीय अस्थिरतेशीही झुंजत आहे. श्रीलंकाचे माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला असून त्यांनी राजीनामाही दिला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे त्यांचा पदभार स्वीकारला आहे.

श्रीलंकेत नव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मला प्रिय असलेल्या माझ्या देशाच्या भल्यासाठी मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीतून माघार घेतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. असे ते म्हणाले.विरोधकांच्या सहकार्यासाठी आमचा पक्ष कठोर परिश्रम करेल.

Sri Lanka Crisis
America and China News : अमेरिका-चीन संघर्षात नेपाळची गोची

यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

यापूर्वी स्वत: सजिथ प्रेमदासा यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. ते म्हणाले की या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आमच्याकडे निश्चितपणे योजना आहे. आम्ही तीन वर्षांपासून गोटाबाया सरकारला चुकीच्या सल्ल्याने आर्थिक पावले उचलू नका, असे सांगत होतो पण. त्यांनी आमचे ऐकले नाही आणि आपण उद्ध्वस्त अवस्थेत आहोत.

तीन उमेदवार जाहीर केले

सजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने राष्ट्रपतीपदासाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान आणि कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हापेरुमा आणि अनुरा कुमारा डिसनायके हे उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील.

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी

श्रीलंकेत काल पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कार्यवाह अध्यक्ष रोनिल विक्रमसिंघे यांनी हा आदेश दिला. आदेशात म्हटले आहे की, आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी १८ जुलैपासून आणीबाणी लागू करण्यात येत आहे. यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती.

राजपक्षे देशातून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे . यानंतर आणीबाणी उठवण्यात आली, मात्र आता आठवडाभरात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com