UNSC: भारतानं अध्यक्ष पद स्विकारताच 'अफगाणिस्तान' वर चर्चा

अफगाणिस्तानमधील ढासळत्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Ts Tirumurti
Ts TirumurtiDainik Gomantak

भारताच्या (India) अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत अफगाणिस्तानमधील ढासळत्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Foreign Minister of India S. Jaishankar) यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ आत्मार (Foreign Minister Mohammad Hanif Atmar) यांच्याशी चर्चा केल्यानंतर अफगाणिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची खुली चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी 'अफगाणिस्तान मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे विशेष सत्राचे आयोजन करण्यावर चर्चा करण्यात आली आहे.

Ts Tirumurti
अफगाणिस्तान होणार दुसरे 'सौदी अरेबिया'; देशात खनिजांचा प्रचंड साठा

संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि ऑगस्ट महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी बुधवारी रात्री ट्विट केले, "परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षतेखाली भारत सविस्तर चर्चा करणार. त्यानंतर अत्मार (अफगाणिस्तान तालिबान संघर्ष) म्हणाले की, तालिबानच्या हिंसाचार आणि अत्याचारामुळे अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेली परिस्थिती रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

Ts Tirumurti
UNSC: सुरक्षा परिषद किती शक्तीशाली आहे; जाणून घ्या

आत्मार यांनी विद्यमान अध्यक्षांचे कौतुक केले

अत्मार यांनी ट्विट केले, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांच्या प्रमुख भूमिकेचे कौतुक करा." युद्धग्रस्त क्षेत्रामधून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. या महिन्यासाठी सोमवारी स्वीकारलेल्या परिषदेच्या अजेंड्यानुसार, अफगाणिस्तानवर बैठक नियोजित नव्हती.

Ts Tirumurti
UNSC चे अध्यक्षपद संभाळणारे मोदी भारताचे पहिलेच पंतप्रधान

तणाव टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्र काय करु शकते?

युनायटेड नेशन्स मुख्यालयात पत्रकारांना तपशील प्रदान करताना, तिरुमूर्ती यांनी अफगाणिस्तानची परिस्थिती आणि युद्धग्रस्त देशात तणाव आणखी वाढू नये म्हणून सुरक्षा परिषद काय करु शकते यावर बोलले. यावर एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांना अपेक्षा आहे की अफगाणिस्तान "कदाचित सुरक्षा परिषद लवकरात लवकर या पैलूकडे लक्ष देईल". हे अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीवर त्वरित चर्चा करण्याची गरज प्रतिबिंबित करते.

Ts Tirumurti
अफगाणिस्तान विद्यार्थ्याला मारहाण  

अफगाणिस्तानात हिंसा वाढत आहे

तिरुमूर्ती म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती ही सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांसाठी गंभीर चिंतेची बाब आहे आणि "अलीकडच्या काळात आम्ही पाहिले आहे की, हिंसा वाढत आहे". भारताने अफगाणिस्तानात शांती, सुरक्षा आणि स्थिरता आणू शकणाऱ्या प्रत्येक संधीचे समर्थन केले आहे.

Ts Tirumurti
UNSC चे अध्यक्षपद भारताकडे; सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले...

भारताने गंभीर चिंता व्यक्त केली

तिरुमूर्ती म्हणाले, "आम्हाला खात्री आहे की हिंसा आणि लक्ष्यित हल्ल्यांच्या प्रश्नांची आपण दखल घेतली पाहिजे. आणि ही अतिशय गंभीर चिंताजनक परिस्थिती आहे. सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा अंत झाला पाहिजे." आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधही आंतरराष्ट्रीय समुदयाने संबंधाना ब्रेक दिला पाहिजे. आम्हाला अफगाणिस्तानात पुन्हा दहशतवाद्यांचे अड्डे स्थायिक झालेले पाहायचे नाहीत. आणि त्याचा थेट परिणाम भारतावर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com