Dalai Lama: चीनमध्ये परत जाण्यावर काय म्हणाले दलाई लामा

Dalai Lama: भारत चीनमध्ये यावरुन वाद निर्माण झाला होता.
Dalai Lama
Dalai Lama Dainik Gomantak

Dalai Lama:तवांगच्या यांग्त्से प्रदेशात भारत चीन सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर चीनने तवांगच्या परवानगीशिवाय अनधिकृतपणे तवांगच्या हवाई प्रदेशात लढाऊ विमाने आणली होती. भारत चीनमध्ये यावरुन वाद निर्माण झाला होता.

त्याचबरोबर,लोकसभा अणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये चीनविरोधी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा भारतात जवाहरलाल नेहरुंच्या काळात आश्रयाला आले होते तेव्हापासून दलाई लामा ( Dalai lama )भारतात स्थायी झाले होते. पत्रकारांनी त्यांना ते परत चीनमध्ये जाणार का असा प्रश्न विचारला . या प्रश्नाला उत्तर देताना दलाई लामांनी चीनला परत जाण्यात काही अर्थ नाही असे वक्तव्य केले आहे. हिमाचल प्रदेशमधील कांग्रा ही जवाहरलाल नेहरुंची पसंद आहे. हे माझे स्थाई निवास आहे. चीनचा तवांगवरील प्रभाव आणि दबावाबद्दल त्यांना विचारले असता,गोष्टी बदलत आहेत , असे दलाई लामांनी म्हटले आहे.

Dalai Lama
Chaman Border : चमन बॉर्डरवर युद्धाजन्य परिस्थिती

युरोप ,आफ्रिका ( Africa ) आणि आशियामध्ये चीन अधिक लवचिक आहे परंतु मला आता परत चीनला जायचे नाही असे दलाई लामांना म्हटले आहे. दलाई लामा भारतात राहत असल्याबद्दल चीन ( China ) बऱ्याच वेळा आपली नाराजी व्यक्त करत असतो. आता दलाई लामांच्या वक्तव्यानंतर चीनची काय प्रतिक्रिया काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com