गोव्‍याच्‍या सीमा ३० एप्रिलपर्यंत बंद

cm pramod sawant
cm pramod sawant

पणजी,

येत्या १४ एप्रिलनंतर टाळेबंदीबाबतचा निर्णय राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येईल. ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी असावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. १४ एप्रिलनंतरचे पुढील १५ दिवस राज्याच्या सीमा बंद राहतील. राज्याबाहेरून कोणालाही गोव्यात येण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. १३ एप्रिलपासून राज्यव्यापी आरोग्य सर्वेक्षण केले जाणार असून कोणताही सर्वेक्षक कोणाच्या घरात न जाता, पाच प्रश्न विचारून त्याची माहिती अॅपवर नोंदवून घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील आर्थिक व्यवहार लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी १४ एप्रिलनंतर काही व्यवसायांना परवानगी दिली जाणार आहे. कोणते निर्बंध असतील, काय करता येईल? काय करता येणार नाही? याची माहिती नागरिकांना राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी झाल्यानंतर देण्यात येईल. राज्य यापुढेही सुरक्षित राहावे, यासाठी राज्यात काही कडक निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. १४ एप्रिलनंतर काही उद्योग सुरू झाले तरी त्या उद्योगात काम करणाऱ्या राज्याबाहेरील कामगारांना येता येणार नाही, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com