'तमनार प्रकल्पानंतर राज्यात २४ तास वीज पुरवठा होईल'

CM pramod sawant
CM pramod sawant

पणजी-  राज्यात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तमनार अणुउर्जा प्रकल्पाची अत्यंत गरज असल्याचे मत  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले होते.  
 राज्यातील  एकूण परिस्थितीबाबत  ते म्हणाले होते की, 'राज्यातील अजूनही काही भागात २४ तास वीज पुरवठा होत नाही.  राज्य सरकारने याआधी सौरउर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावर ५० टक्क्यांची सुट देऊनही फक्त २९ लोकांनीच त्याचा लाभ घेतला होता,' अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.
  
सद्यस्थितीत  औद्योगिक कारखानांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा  करता येत नाही याची खंत व्यक्त करताना त्यांनी मोलेमच्या जंगलामधून जाणाऱ्या वीज प्रकल्पाला विरोध झाला होता त्याकडेही लक्ष वेधले.        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com