
BalRath Employees on Strike in Goa: बालरथ कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशानात या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले, परंतु तसे कोणतेही परिपत्रक अजून आलेले नाही.
आमच्या मागण्यांसाठी आम्ही विधानसभा अधिवेशनापासून म्हणजेच 27 मार्चपासून येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा इशारा बालरथ कर्मचारी संघटनेच्या प्रमुख स्वाती केरकर यांनी दिला.
आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत केरकर बोलत होत्या. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 24 मार्चपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत. तरीही बालरथ 27 मार्चपासून बंद राहतील. परंतु शाळा प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आणि त्यातून काही अनुचित घडल्यास संघटना जबाबदार नसेल, असे केरकर म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.