सतर्क रहा अन्‌ भूस्खलनाचा धोका ओळखा!

लोकांना करणार आत्‍मनिर्भर : सेंटर फॉर सिटीझन रिसर्च देणार प्रशिक्षण
Landslide in Goa
Landslide in GoaDainik Gomantak

पणजी: गेल्या काही वर्षांत हवामानातील बदलामुळे राज्यात अनियमित पाऊस आणि अतिवृष्टी वाढली आहे. भूस्खलन, दरडी कोसळण्‍याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. भूस्खलनात जीवितहानी टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क उपक्रमाअंतर्गत गोमंतकीयांना आत्मनिर्भर बनवण्याचा विचार करत आहे.

(Be alert and identify the risk of landslides in goa)

Landslide in Goa
भाजयुमो वास्कोतर्फे 'आणीबाणी काळा दिन'चे आयोजन

यासाठी सेंटर फॉर सिटीझन रिसर्च (सीसीआर) या पुणे येथील बिगरसरकारी संस्थेच्या सहकार्याने लोकांना भूस्खलनाचा अंदाज बांधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासंरदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची बैठक झाली. या बैठकीत सीसीएसचे नितीन ताम्‍हणकर, यशोधन पानसरे, मिताली इनामदार आणि सायली सारोळकर यांनी उपक्रमाचे सादरीकरण केले.

पावसामुळे पश्‍चिम घाटात होणाऱ्या भूस्खलन घटनांचा अभ्यास करण्याची सुरुवात सीसीएसने केली होती. मुख्य म्हणजे यात सर्वसामान्य माणसांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षांत पडलेल्या पावसाची माहिती विश्‍लेषण करून कुठल्या भागात भूस्खलन होणार याचा अंदाज बांधण्याचे काम संस्थेने सुरू केले आहे. यात त्यांना सुमारे 70 ते 80 टक्के यश मिळाल्याने जीवितहानी टाळता आली आहे. भूस्खलन होणार आहे, याची माहिती वेळेत प्रशासनाला पुरवण्यात आल्याने हे साध्य झाले आहे. सगळीकडे अधिकारी पोहोचणार नाहीत. यासाठी लोकांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश संस्थेचा आहे, जेणेकरून लोकांना स्वतः आपल्या परिसरात असलेला धोका ओळखता येईल.

Landslide in Goa
पोलिस भरती प्रक्रिया नव्‍याने सुरू करा; विकास भगत यांची मागणी

असा घेतला जातो भूस्‍खलनाचा अंदाज

भूस्खलनाचा धोका ओळखण्यासाठी परिसरात एकूण पडलेल्या पावसाची माहिती तसेच परिसरात पावसामुळे होणाऱ्या छोट्या घटना उदाहरणार्थ झाड पडणे, संरक्षण भिंत कोसळणे याची नोंद घेतली जाते. सर्व घटनांचे विश्‍लेषण केल्यानंतर भूस्खलन होणार की नाही याचा अंदाज बांधला जातो. नैसर्गिक घटकांमुळे होणाऱ्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असते. त्या तुलनेत मानवी हस्तक्षेपामुळे होत नाही.

‘एमजेओ’मुळे कोसळतो मुसळधार पाऊस

मॅडन ज्युलियन ओसिलेशन (एमजेओ) या प्रकारामुळे 20 दिवसांचा पाऊस केवळ 3 दिवसांतच पडतो. अरबी समुद्रात आणि बंगालच्या खाडीत एकाच वेळी वातावरणीय घटना घडल्याने हा प्रकार होत आहे. या घटना योगायोगाने होत असतात. त्यामुळे जास्त पाऊस पडतो, परंतु शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com