पणजी : एखादी महिला गृहआधार योजनेची लाभार्थी असल्यानंतर अचानकपणे तिच्या पतीचे निधन होते, तेव्हा त्या लाभार्थी महिलेला केवळ एका योजनेचा लाभ घेता येतो. ही त्रुटी लक्षात घेऊन समाज कल्याण खात्याच्यावतीने यापुढे आता दयानंद सामाजिक सुरक्षा योजना (डीएसएसवाय) आणि गृहआधार योजना एकत्रित देण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
विधानसभेत समाजकल्याण खात्याच्या अनुदान मागण्यांवर उत्तर देताना मंत्री फळदेसाई बोलत होते. ते म्हणाले, विधवा भगिनींकरिता डीएसएसवाय आणि गृहआधार ह्या दोन्ही योजना एकत्रित देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. आर्थिक अडचणींमुळे डीएसएसवायची रक्कम वेळेवर देता आली नव्हती. आता केवळ जून आणि जुलै या महिन्यांचे पैसे बाकी असून, ते पुढील महिनाभरात देण्यात येतील.
कोविड काळात कर्त्यापुरुषाचे निधन झाले असेल तर त्यासाठी राज्य सरकारकडून दोन लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. याकरिता आतापर्यंत 2365 अर्ज आले असून, 2142 लाभार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी 1251 लाभार्थींना सुमारे 25 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय व्यावसायिकांना 5 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. या योजनेसाठी सुमारे 1 लाख 14 हजार अर्ज आले असून, ते छाननी करून एकत्रित देण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी सभागृहात दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.