निसर्ग संवर्धनात प्रत्येकाने वाटा उचलावा

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आर्लेकर : ठाणेतील पदभ्रमण मोहिमेत सहभाग
Rajendra Arlekar
Rajendra ArlekarDainik Gomantak

वाळपई : गोवेकरांची जीवनशैली झपाट्याने बदलू लागलेली आहे. तरीसुद्धा गोवेकरांनी आपली संस्कृती व स्वभाव टिकून ठेवलेला आहे. त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

ठाणे - सत्तरी येथे आयोजित कार्यक्रमात ते पुढे म्हणाले, की सुमारे ४ कोटी खर्चून हिमाचल प्रदेशमध्ये कायमस्वरूपी पदभ्रमण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पदभ्रमण मोहीम आयोजित करून त्या भागातील नैसर्गिक सौंदर्याला वाव देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे.

ठाणे - सत्तरी पंचायत सभागृहात आयोजित या कार्यक्रमास ऑल इंडिया युथ हॉस्टेलच्या गोवा शाखेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सचिव मनोज जोशी, पंचायतीचे प्रशासक अझीझ शहा, सचिव विनायक गावकर, सचिव सर्वेश गावकर पंचायतीचे माजी उपसरपंच गोविंद कोरगावकर उपस्थित होते.

मनोज जोशी यांनी या पदभ्रमण मोहिमेसाठी आमदार दिव्या राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.

Rajendra Arlekar
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

पुढील मोहीम महावीर अभयारण्यात : गेल्या दहा वर्षांपासून पदभ्रमण मोहीम आणि शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. यंदा याला अतिशय चांगला लाभला असून 600 नागरिक सहभागी झाले आहेत‌. येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे हिवाळी पदभ्रमण मोहीम भगवान महावीर अभयारण्यात होणार असल्याचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com