
पणजी : ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाच्या (टीटीएजी) यावतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पर्यटन उद्योग क्षेत्रातील मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
युके, कॅनडा आदी युरोपीय देशांतून अनेक विदेशी पर्यटक भारतातील पर्यटनस्थळांना भेट देतात. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योगात मंदी आली आहे. या पार्श्वभूमीवर देशात येणाऱ्या 5 लाख विदेशी पर्यटकांना मोफत ई-व्हिसाची मर्यादा काढून टाकून त्यात वाढ करावी. तसेच या योजनेची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवावी, अशी मागणी शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
पर्यटन उद्योगाशी संबंधित सर्व बाबी गोवा पर्यटन मंडळाच्या माध्यमातून हाताळल्या जाव्यात, कायदेशीर तरतूद करून या मंडळास निर्णयाचे अधिकार द्यावेत तसेच पर्यटन क्षेत्राचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी आणि नियंत्रण या मंडळाकडे द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दलालांची साखळी
मिरामार, पणजी, बागा, कांदोळी, कळंगुट, बागा आदी पर्यटनस्थळी बेकायदा दलालांची साखळी कार्यरत आहे. रस्त्यावर कुठेही उभे राहून हे दलाल पर्यटकांना त्रास देत आहेत. यातील अनेकजण पर्यटकांना लुटतात, असे निवेदनात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.