‘मासेमारीला १५ ऑगस्टनंतर सुरू’

T
T

नावेली

सध्या समुद्र अद्याप खवळलेला असल्याने तसेच काही ट्रॉलर मालकांनी यावेळी कोरोना मुळे एक महिना उशिरा १ सप्टेंबर पासून मासेमारीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कुटबण जेटीवरुन एकही ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी गेलेला नाही. परंतु १५ ऑगस्टनंतर मासेमारीला सुरुवात होण्याची शक्यता कुटबण फिशरीज सोसायटीचे अध्यक्ष विनय तारी यांनी व्यक्त केली.
फिशिंगसाठी जाण्यास आतापर्यंत कुटबण जेटीवर केवळ पाच टक्के खलाशी जेटीवर पोहचले असून ते आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांमधून आले आहेत, असे तारी यांनी सांगितले.
खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मासेमारीसाठी गोव्यात येणाऱ्या खलाशाना राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागत असल्याने काही खलाशी कामगारांना अडचणी निर्माण होत असल्या तरी मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील चार पाच दिवसांत खवळलेला समुद्र शांत होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून १५ ऑगस्टनंतर मासेमारीला समुद्रात जातील, असे तारी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com