Goa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी''

panjikar 1.jpg
panjikar 1.jpg

पणजी: गोव्यातील(Goa) भाजप सरकारने (BJP government) 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारकडून ही आकडेवारी अधिकृतरीत्या आता जाहीर झालेली असली तरी मार्च 2020 पासून गोव्यातील सर्व मृत्यूंची तसेच सरकारच्या कोविड (covid19) हाताळणी व व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे(Congress) सरचिटणीस अमरनाथ पणजीकर (Amarnath Panajikar) यांनी कॉंग्रेस हाऊस मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देवून निष्पक्ष न्यायालयीन चौकशीसाठी वाट मोकळी करावी. गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळून सरकारला चुकीचे सल्ले देणारी आरोग्यमंत्र्यांनी गठीत केलेली तज्ञांची समिती त्वरित बरखास्त करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. (Goa Gov management of government should be judicially investigated)

आरोग्यमंत्री विश्वजित राणे(Vishwajit Rane) यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोमंतकीय व कॉंग्रेस पक्षाची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेस नेत्यांनी केली. पत्रकार परिषदेला महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर व सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर उपस्थित होते. 

कोविड संसर्गाची लागण झालेल्यांची आकडेवारी व मृतांचा आकडा यात सरकारने सुरूवातीपासून घोळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मंजूरी नसताना सरकारने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्याचे ठरविले. यावरुन भाजप सरकार कोविड हाताळणी व व्यवस्थापनांत पुर्णपणे अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. सरकारने जाणीवपुर्वक रुग्णांना कोविड मृत्युच्या जबड्यात ढकलले. आरोग्यमंत्र्यांनी गोव्याचा "प्रयोगशाळा" म्हणुन वापर करताना गोमंतकीय रुग्णांना "गिनी पिग" केले असा गंभीर आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. 

5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 पर्यंतच्या कालावधीत कोविडने मरण पावलेल्या ६७ जणांची नोंदणी णव महिने होत नाही यावरुन या सरकारचा निर्लज्जपणा दिसतो असा टोला कॉंग्रेस नेत्यांनी हाणला आहे. भाजप सरकार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी "अच्छे दिन" ची कृत्रीम भावना तयार करुन "शो मस्ट गो ऑन" म्हणत "आजाराचा बाजार" करीत जनतेला लुटले  व जाणीवपुर्वक संसर्ग झालेल्यांची व मृतांची आकडेवारी लपवुन ठेवण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयव्हरमेक्टिन(Ivermectin) गोळ्यांचा कोविडसाठी वापर करणे बंद करण्याचे दिलेले निर्देश म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंवर एक थप्पड असुन, सुमारे 22 कोटी 50 लाख रुपयांच्या सदर गोळ्यांच्या खरेदीवर कमिशन खाण्यासाठीच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी सदर गोळ्यांचे वाटप करण्याचा हट्ट धरला होता हे आता उघड झाल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. 

सरकारला गोव्यातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद करुन सिंधदुर्गला ऑक्सिजन सिलींडर (Oxygen cylinder) पाठविण्यास सांगणारे, तज्ञांचा म्हणणे न मानता आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास लावणारे, तसेच गृह विलगीकरण सामग्रीत नादुरूस्त ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्याचा सल्ला देणाऱ्या विश्वजीत राणेंच्या सर्व तथाकथीत तज्ञ सल्लागारांवर कडक कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.

भ्रष्ट भाजप सरकारने शेकडो लोकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बळी गेल्या नंतरही गोमेकॉत आक्सिजन प्रकल्प अजुनही कार्यांवित केला नाही हे धक्कादायक आहे. सरकारची असंवेदनशीलता यातुन उघड होते. भाजपने आपल्या नाकर्तेपणाने  निष्पापांचे बळी घेत हजारो संसार उध्वस्त केले व अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचुर केला. भाजपच्या ह्या क्रुर कर्मांना माफी कदापी मिळणार नाही असे महिला कॉंग्रेस अध्यक्षा बीना नाईक यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाने सातत्याने केलेल्या मागणीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) झोपेतुन जागे झाले व लसीकरणांवर त्यांनी घोषणा केली. प्रधानमंत्र्यांची सदर घोषणा म्हणजे परत एकदा जुमला ठरणार नाही अशी आशा आम्ही बाळगतो असा टोला बीना नाईक यांनी हाणला आहे.

सरकार कोविड लसीचा योग्य साठा मिळवू शकत नसताना, गोव्यातील खासगी इस्पितळांना वेगवेगळ्या उत्पादकांच्या लसी कश्या उपलब्ध होतात हे सरकारने जनतेला सांगावे अशी मागणी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकसान भरपाई म्हणुन कोविड मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहिर केलेले प्रत्येकी रुपये 4 लाख तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेले रुपये 2 लाख असे एकुण सहा लाख रुपये आजपर्यंत किती कुटुंबियांना वितरीत करण्यात आले याचा तपशिल डॉ. प्रमोद सांवत यांनी जनतेसमोर ठेवावा. सरकारने त्वरित व कोणत्याही अटीविना सदर रक्कम मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करावी अशी मागणी ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केली.

कोविड महामारीत कॉंग्रेस पक्षाने कोणतीच जाहिरातबाजी न करता लोकांची सेवा केली व गरजवंताना मदतीचा हात दिला. लोक संकटात असताना व हजारो कुटुंबिय शोक सागरात बुडाली असताना भाजपचे सर्व मंत्री व पदाधिकारी केवळ उत्सव साजरे करुन जाहिरातबाजी करण्यात व्यस्त राहिले असे सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर म्हणाले. 

गोमंतकीयांनी भाजपच्या गैरकारभाराची आठवण ठेवावी व आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांना धडा शिकवावा अशी विनंती सर्व कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com