Goa Politics: सरदेसाईंनी टीका करावी, पण ती विश्‍वासपूर्ण असावी; माविन गुदिन्होंचा टोला!

Goa Politics: सरकारवर केलेल्या टीकेवर, भाजपचे माविन गुदिन्हो यांनी आकडेवारी घेऊन सरदेसाईंनी टीका करावी, असा टोला लगावला.
Goa Politics | Mauvin Godinho
Goa Politics | Mauvin GodinhoDainik Gomantak

Goa Politics: गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी नीती आयोगाच्या अहवालावरून राज्य सरकारवर केलेल्या टीकेवर भाजपचे शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थितरीत्या आकडेवारी घेऊन सरदेसाई यांनी टीका करावी, असा टोला लगावला. विरोधक असावा, त्यांनी टीका करावी त्यातून सत्ताधारी काही सुधारणा करू शकतात, परंतु त्या टीकाही विश्‍वासपूर्ण असाव्यात, असेही गुदिन्हो म्हणाले.

या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर, आमदार दाजी साळकर उपस्थित होते. आमदार सरदेसाई यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या यादीत गोव्याचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे याचा अहवाल मांडत गुदिन्हो म्हणाले, की राज्य सरकारला विकासामुळेच तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

Goa Politics | Mauvin Godinho
Goa News: गोव्यात सरस्वतीचा संचार थांबविणाऱ्यांना बेताळच पाहून घेईल- देवदत्त पटनायक

विरोधक असणे ही गरजेची बाब आहे, त्यांनी टीकाही केली पाहिजे. परंतु त्यासाठी ठोस कारणेही असावीत. नीती आयोगाच्या अहवालावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बेरोजगारी आहे, ती नाकारलेली नाही, परंतु जी आकडेवारी सांगितली जाते, त्यापेक्षा कमी आहे.

काँग्रेसचे आठजण फुटून भाजपात आल्याने विजय सरदेसाई एकटे पडले आहेत. त्यांची नाराजी आम्ही ओळखून आहोत असे सांगत गुदिन्हो म्हणाले, केंद्र सरकारने 450 कोटी करापोटीची रक्कम दिली आहे. त्याशिवाय यापूर्वी गोवा मुक्तीची 60 वर्षे झाल्याने केंद्राकडे आम्ही 100 कोटी मागितले, तर त्यांनी 300 कोटी रुपये दिले.

कोविड काळात सर्वत्रच बेरोजगारी वाढली, त्यातून जगातील सर्व देश सुटले नाहीत, त्याला गोवा अपवाद कसा असू शकतो. नीती आयोगाच्या काही गोष्टी आपल्याला हव्या तशा वापरून सरकारवर टीका करण्याचे धोरण सरदेसाई यांचे दिसते.

Goa Politics | Mauvin Godinho
Goa Government: नीती आयोगाच्या अहवालावरुन सत्ताधारी अन् विरोधक आमने-सामने

दाजी साळकर म्हणाले, नीती आयोगाच्या अहवालात गोवा अनुक्रमेत आघाडीवर आहे. सरदेसाई यांनी विधानसभेत 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचे सांगितले होते, ही आकडेवारी त्यांनी कोठून आणली हे काही समजत नाही. भाजप सरकार लोकांसाठी काम करीत आहे, हे सर्वांना दिसते.

‘गोवा फॉरवर्डचे नाव बदला’

सरदेसाई हे आपण सरकारला अनेक बाबींमध्ये उघडे पाडत असल्याचे सांगतात, परंतु यापूर्वी गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न सरदेसाई करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी उघड केले होते. विजय सरदेसाई हा एक राजकीय पक्ष आहे. फातोर्डा सोडला तर त्यांचा कोठेच प्रभाव नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाचे नाव बदलून ‘ग्रेटर फातोर्डा पार्टी’ करावे, अशी आपली त्यांना विनंती असल्याचे वेर्णेकर यांनी सांगितले.

‘रोजगाराचा प्रश्‍न सोडविणार’

राज्य सरकार सर्वांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे खासगी क्षेत्र महत्त्वाचे आहे. त्याकरिता नव्या औद्योगिक धोरणानुसार इको फ्रेंडली इंडस्ट्री येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार आम्हाला मदत करीत आहे. पर्यटन खात्यातही अधिकाधिक स्थानिकांना संधी मिळावी म्हणून त्या खात्यातर्फे लक्ष दिले जात आहे, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com