पणजी: २० सप्टेंबरनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करता येतील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने कळवले आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले.
ज्यांच्या घरात कोविड लागण झालेली व्यक्ती नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, असे ठरले आहे. पालकांची संमतीही आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या अटींच्या अधीन राहून शाळेत येण्यास परवानगी दिली जाणार आहे. सॅनिटायझर्सचा वापर, समाज अंतर पाळणे, वैयक्तिक स्वच्छता, मुखावरण वापरणे आदींचे पालन करावे लागणार आहे. याआधी पालक शिक्षण संघटना आणि मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या संघटनांशी चर्चाही केली जाणार आहे.
संपादन: ओंकार जोशी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.