
गुळेली: भारत ही सुवर्णभूमी होती. आपल्या देशाला गौरवशाली इतिहास होता. मातृभूचे ते वैभव परत मिळवण्यासाठी हजारो लोक काम करत आहेत. या कार्यात प्रत्येकाने स्वत:ला जोडून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थेचे महाराष्ट्र प्रांत कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी यांनी व्यक्त केले.
साखळी येथे गोवा शाखेने आयोजित केलेल्या व्यक्तित्त्व विकसन शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शांताराम काणेकर, गोवा शाखेचे संयोजक वल्लभ केळकर उपस्थित होते. साखळी येथील लक्ष्मीबाई संझगिरी मेमोरियल हायस्कूल (बालमंदिर) येथे तीन दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन प्रकाश राजाध्यक्ष यांच्याहस्ते झाले. ओंकार केळकर, स्वप्ना धुपकर, वल्लभ केळकर, तेजस्विनी जेलुगडेकर, तेजा परब, सानिका मोने, हेमा मराठे, चिन्मय मराठे, रामदास गर्दे, सुनील नाईक, वल्लभ केळकर, विवेक मणेरीकर यांनी मार्गदर्शन केले.
निष्ठा पटवर्धन व वेद मराठे यांनी विवेकवाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय किंजवडेकर यांनी केले. पूजा बर्वे यांनी ओळख करून दिली. शिबिर प्रमुख तन्वी भाटवडेकर यांनी आभार मानले.
लोखंडी स्नायू, पोलादी नसा, वैचारिक स्पष्टता आणि समाज शत्रूंशी लढण्याची ताकद असणारे युवक-युवती स्वामी विवेकानंदांना अपेक्षित होते. आपल्या मुलांचे व्यक्तित्त्व अशा प्रकारे घडावे यासाठी शिबिरांची गरज आहे.
- मदगोंडा पुजारी, विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत प्रमुख
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.