पणजी: गेल्या आठ दिवसांपासून उष्म्याने गोमंतकीयांच्या अंगाची लाहीलाही झाली. बुधवारी मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला. आज चक्क 25 अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली उतरला होता. पण, पुढील काही दिवस तापमानात वाढ दिसेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून गोव्यातील तापमान 35 अंशापासून ते 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने गोमंतकीय हैराण झाले होते.
परप्रांतीय पर्यटकांनी हैराण होऊन पर्यटन दौरे अर्ध्यावर सोडण्याचा विचार चालविला असतानाच आज पहाटे वातावरणात थोडा गारवा होता. पहाटे पणजीत पारा 25 अंशावर होता. 10वा.च्या सुमारास 32 तसेच 1 ते 3 वाजेपर्यंत 35 अंशावर होता. पण त्यानंतर पुन्हा पारा घसरून 29 अंशावर आला. या आठवड्यात पहिल्यांदाच तापमान घातल्याने लोकांनी सुस्कारा सोडला. किनारपट्टीच्या प्रदेशात सगळीकडेच आज तापमान घटले होते.
मुंबईत पहिल्यांदाच 27.6 अंश तापमानाची नोंद झाली. याबाबत ‘गोमन्तक’कडे बोलताना हवामान शास्त्रज्ञ एम. राहुल म्हणाले, राज्यात सगळीकडेच एकसारखे तापमान नाही, काही ठिकाणी ते नेहमीप्रमाणे होते. पुढील काही दिवस तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. आठ दिवसांत पहिल्यांदाच पारा उतरला
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.