‘सत्य व भाजप यांची सांगड बसत नसल्यानेच बदली’: दिगंबर कामत

Honesty and BJP can not go together says Digambar Kamat
Honesty and BJP can not go together says Digambar Kamat

पणजी: सत्याचे पालक राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. सत्य व भाजप यांची सांगड बसू शकत नाही व त्यामुळेच राज्यपालांचा बदली आदेश निघाला, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.  

गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची  जेव्हा अत्यंत गरज होती त्याचवेळी त्यांची बदली होणे हे खरेच दु:खदायी आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले व सामान्य माणसांचा आदर करणे व पर्यावरण व निसर्गाची  राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे बद्दल त्यांना नेहमीच चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा असा सरकारला नेहमी सल्ला देत होते असे कामत यांनी नमूद केले आहे.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com