
सत्तरीत पाणी टंंचाई जाणूनबुजून निर्माण केली जात असून यासाठी टँकर माफिया जबाबदार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी आणि टँँकर माफिया साटेलोटे असल्याने पाणी टंंचाई होत आहे.
कारण पाणी सोडण्यासाठी असलेले कर्मचारी व्हॉल्व नीट खुले करत नसल्याने अनियमित पाणी पुरवठा होतो. परिणामी लोकांना टँँकर बोलावण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याने हा टँँकर माफियांना फायदा होत आहे, असा आरोप नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी केला. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणि टँकर माफिया यांचे साटेलोटे उघड करणार आहे. अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्याशी बोलणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
"नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणि टँकर माफिया यांचे साटेलोटे असल्याचे विधान केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे."
"समस्येवर योग्य तोडगा काढला जाईल. परंतु नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी खात्याकडून नवीन प्रकल्प उभारले जात आहेत, परंतु लोकांकडून कामांमध्ये अडथळा निर्माण केला जात आहे."
- नीलेश काब्राल, मंत्री, सार्वजनिक बांधकाम खाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.