Narendra Singh Tomar : गोव्यातील मातीचा ऱ्हास थोपविणार!

केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती
Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar Dainik Gomantak

गोव्यातील मातीच्या दर्जाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे नारळ, काजू, आंबा आणि भात यासह अन्य पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मातीचा सकसपणा वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी संसाधन केंद्रामार्फत विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत दिली.

Narendra Singh Tomar
Pune: ओशो आश्रमात निर्माण झाला गोंधळ; पोलिसांनी केला लाठीचार्ज

खासदार फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. नारळ, काजू, आंबा यासह सुपारी आणि इतर मसाल्याच्या पिकांवर मातीच्या दर्जामुळे परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खास प्रतिजैविके

काही भागांत जमिनीचा खारटपणा वाढला आहे. खारट पाणी शेतात शिरू नये, यासाठी खाजन बांध सक्षम करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मातीचा कस वाढण्यासाठी गोवा बायो 1, गोवा बायो -2अशी प्रतिजैविके तयार केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com