Vande Bharat : Mumbai -Goa मार्गावरही आता ‘वंदे भारत’ रेल्वे

‘वंदे भारत’ प्रतितास 160 किलोमीटर वेगाने धावते
Goa-Mumbai Vande Bharat Express
Goa-Mumbai Vande Bharat ExpressDainik Gomantak

Vande Bharat : देशभरात भारतीय रेल्वे विभागातर्फे ‘वंदे भारत’ ही नवी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई ते गोवा मार्गावरही ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली.

Goa-Mumbai Vande Bharat Express
Shocking : विर्डी येथे बारा वर्षीय मुलासह दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्रातील (कोकण) एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेतली. सध्याच्या घडीला ‘वंदे भारत’ ही रेल्वे सेवा सर्वांत वेगवान मानली जाते. प्रतितास 160 किलोमीटर या वेगाने ती धावत असल्याने अनेक राज्यांत ही सेवा सुरू झाली आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दर आठवड्याला मुंबई ते गोवा या मार्गावर लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. ही दोन्ही ठिकाणे प्रवासी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची असल्याने या मार्गावर ही सेवा सुरू करणे आवश्‍यक असल्याचे या शिष्टमंडळाने मंत्री दानवे यांना सांगितले.

मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com