गोवा-मुंबई हायवेवरील अपघातात एकाचा जागीच मृत्यू

One died on the spot in an accident on Goa Mumbai highway
One died on the spot in an accident on Goa Mumbai highway

राजापूर: गोवा-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या कठड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी कठड्यावर आदळून झालेल्या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. राकेश तुकाराम गुरव असे या तरुणाचे नाव आहे. तसेच दुसरा दुचाकीस्वार समीर शंकर बाईत हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रत्नागिरीमधील शासकीय रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना काल रात्री सव्वानऊच्या सुमारास ओणीमधील पेट्रोलपंपासमोर घटना घडली आहे. (One died on the spot in an accident on Goa Mumbai highway)

ओणीमधील पेट्रोलपंपाकडून राकेश तुकाराम गुरव आणि समीर बाईत हे दोघे दुचाकीने चुनाकोळवणकडे निघाले होते. ओणी येथील पेट्रोलपंपासमोर असलेल्या कठड्याजवळ दुचाकी आली असता, गाडी कठड्यावर आदळली. यावेळी समीर शंकर बाईत दुचाकी चालवीत होता. राकेश त्याच्याबरोबर पाठीमागे दुचाकीवर बसला होता. या अपघातामध्ये दोघांनाही जबरदस्त मार लागला. यामध्ये राकेशच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com