
कळंगुट : पंचायत निवडणुका स्वतःच्या मर्जीनुसार घेण्याचा सरकारचा बेत अखेर फसला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याबाबतीत दिलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी काणका येथे सांगितले. सध्या शासकीय अधिकाऱ्यांकडून चालविण्यात येत असलेला पंचायत कारभार लोकांना सोयी देण्यापेक्षा त्यांच्या गैरसोयीत भर घालत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार होण्यापूर्वी आपण पर्रा पंचायतीचे सरपंचपद पंधरा वर्षे सांभाळलेले आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा चांगल्यापैकी अनुभव आहे, असेही त्या म्हणाल्या. काणका-वेर्ला पंचायतीत स्थानिक जनतेला विविध प्रकारची रोपटे तसेच नारळांच्या माडांचे कवाथे वाटप करण्याच्या कार्यक्रमात आमदार दिलायला लोबो बोलत होत्या.
यावेळी काणका-वेर्लाच्या माजी सरपंच अमिता कोरगावकर, माजी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष वासुदेव कोरगावकर, माजी पंचायत मंडळी उपस्थित होती. प्रत्येक गावातील पंचायत मंडळावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे लोकांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे नाते असते. त्यामुळे गावातील अनेक विकासकामांना सहज आणि सुलभ अशी वाट करून दिली जाते. मात्र, सध्या पंचायत कारभार सांभाळणारे शासकीय अधिकारी यांचे स्थानिक लोकांशी कुठल्याही प्रकारचे थेट संबंध नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पंचायत मंडळाचा कार्यकाळ पूर्ण होताच तात्काळ निवडणुका होणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी सांगितले
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.