नवी दिल्ली: संसदेच्या सोमवारपासून (ता. १४) सुरू होणाऱ्या आणि पंधरवडाभर चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने चर्चा व मंजुरीसाठी तब्बल ४० ते ४६ विधेयके सज्ज ठेवली आहेत. यात कोरोनाकाळात काढलेल्या ११ वटहुकुमांना (अध्यादेश) संसदेची मंजुरी घेण्याच्या विधेयकांचाही समावेश आहे. मास्क वापरणे व सामाजिक अंतरभानाचे काटेकोर पालन, सेंट्रल हॉल पत्रकार-माजी खासदारांसाठी बंद व संसदेच्या आवारात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला कोरोना आरटी पीसीआर चाचणी सक्तीची अशा अनेक वेगळेपणासह हे अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनात अर्थमंत्रालयाची ८, गृह -७, आरोग्य- ९ ते १०, कृषी -६, कामगार व श्रम कायदे - ३ , जहाजबांधणी, बंदरे व विमानवाहतूक - ५ संसदीय कामकाज -२ या मंत्रालयांच्या विधेयकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत साप्ताहिक सुट्या न घेता चालणार आहे. देशातील कोरोना महामारीच्या उद्रेकाच्या काळात होणाऱ्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत दिवसातील दोन भागांत बैठका होतील. लोकसभा व राज्यसभा यांचे खासदार दोन्ही सभागृहांत व प्रेक्षक गॅलऱ्यांतही बसतील. सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ७ या काळात या बैठका होतील. अशा प्रकारचे हे पहिलेच व अभूतपूर्व अधिवेशन ठरणार आहे. यात प्रश्नोत्तर तास रद्द केल्याने आणि शून्य प्रहराचा वेळही अर्ध्या तासावर घटविल्याने उरलेल्या साडेतीन तासांत जास्तीत जास्त कामकाज करून घेण्याकडे सरकारचा कल आहे.
महत्त्वाची काही विधेयके
मंजुरीच्या प्रतीक्षेत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.