
राज्यात पाऊस सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले दिसून आले. यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील उपस्थित झाला. पणजीसह अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर बऱ्याच प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
खोर्ली, म्हापसा येथील उसापकर जंक्शन परिसरात गुरुवारी 30 जूनला बऱ्याच प्रमाणात पाणी साठले होते. यासंदर्भात रस्त्यानजीक असलेली गटार खुली केल्यावर हे पाणी साठण्याचे कारण समोर आले.
पाण्याचा निचरा होण्यासाठीची यंत्रणाच डबघाईला आल्याचे चित्र दिसून आले.गटारांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचे खच पडले असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकत नाही आणि म्हणूनच ठीक-ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत.
दरम्यान राज्यभरातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच पाणी साचल्यामुळे अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न येता वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पाणी रस्त्यावर साठू नये यासाठी असलेली गटारेच मुळात प्लास्टिक आणि घाणीने भरल्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.