मुरगाव: केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्याच्या हितासाठी खाणकाम सुरू करण्यासाठी पावले उचलत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीहून आल्यानंतर दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अन्य भागधारकांची भेट घेतली. राज्यात खाणकाम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील खाणकाम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने १०० टक्के सहकार्य व पाठबळ दिले आहे. खाणकाम पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत. खाण मालकांनी यापूर्वीच केंद्राकडे आपले म्हणणे मांडले आहे आणि सर्व पावले उचलली जातील. खाणी पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले गेले. सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्याच्या हितासाठी खाण सुरू करण्यासाठी पावले उचलत आहेत, असे डॉ. सावंत म्हणाले.
आणखी वाचा:
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.