Goa News : सत्तरीत भातकापणीला प्रारंभ

समाधानकारक पीक आल्याने बळीराजा सुखावला
Start rice harvest happy satisfactory farmer
Start rice harvest happy satisfactory farmerdainik gomantak

वाळपई : सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत सध्या भात पिकाची कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू असून यंदा समाधानकारक पीक मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, यंदा संततधार पावसामुळे काही प्रमाणात भाताला कीड लागली होती.

वाळपई येथील शेतकरी तथा माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी पारंपरिक शेती जोपासली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र शेतीकामात वावरत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून वेळूस येथील त्यांच्या शेतजमिनीत भात कापणीला सुरुवात झाली आहे. यावेळी तुकाराम हळदणकर म्हणाले, दिवसेंदिवस वाढणारी महागाई तसेच शेतमजुरांचे वेतन शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र, भात शेती करून केलेल्या कामाचे समाधान मिळते. पूर्वजांचा वारसा आम्ही जपला आहे.

मशीनरीचा अभाव :

सरकारच्या कृषी खात्यातर्फे जर भात कापणीवेळी मशीन मिळाले असते तर काही प्रमाणात फायद्याचे झाले असते. कारण मशीनव्दारे एका दिवसाच्या आत भात पिकाची कापणी करता येते. मात्र, मशीन नसल्याने एक दिवसाच्या कामाला सहा दिवस लागले. त्यामुळे त्या कामगारांवर जास्त पैसे खर्च करावे लागले. कृषी खात्याने शेतकऱ्यांना भात कापणीचे मशीन उपलब्ध करावे, अशी मागणी तुकाराम हळदणकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com