पणजी: राज्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग २१ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आज शिक्षण संचालनालयाच्या पथकाने शाळांची तपासणी केली आहे. शनिवारपासूनच हे वर्ग सुरू होणार आहेत, कोणत्याही शाळांना आम्ही सोमवारपासून किंवा आठवड्याने वर्ग सुरू करण्यास पवानगी दिलेली नाही, अशी माहिती शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी ‘गोमन्तक''ला दिली.
मिळालेल्या माहितीनुसार कुजिरा येथील काही शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पालकांनी पुढील आठवड्यात आम्ही पाल्याला पाठवू, असे स्पष्ट सांगितले आहे. तर पणजीतील काही प्रतिष्ठित शाळांत सोमवारपासून बारावीचे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी मर्यादा
शिक्षण संचालकांशी ‘गोमन्तक''ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, संचालनालयाने २१ ही तारीख दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ठरविली आहे, त्यात कोणताही बदल नाही. संचालनालयातर्फे आज एका पथकाने शाळांची काय तयारी झाली आहे, याची पाहणी केली आहे. त्यात शाळांनी बैठक व्यवस्था व परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे दिसून आले आहे. एका वर्गात १२ विद्यार्थी अशी व्यवस्था असल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये भरपूर अंतर राहू शकणार आहे, असे आमोणकर म्हणाले. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी उद्या उपस्थित राहिले तर साधारण ३० हजारांच्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. परंतु काही पालकांनी आम्ही पाल्याला पुढील आठवड्यात पाठवू, असे शाळा व्यवस्थापनाला कळविले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.