
Vijai Sardesai : कळंगुट येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार मायकल लोबो यांनी गोव्यात व्यासायिकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा जो आरोप केला आहे तो गंभीर स्वरूपाचा असून या खंडणी बहाद्दरांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आशिर्वाद आहे का असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.
लोबो यांनी जे आरोप केले आहेत त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी अजून कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामूळे या खंडणी बहाद्दरांकडे मुख्यमंत्र्यांची मिलीभगत असल्याचे दिसते. जर लोबो खोटे बोलून गोव्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे नाव खराब करत असतील तर त्यांनी लोबोंवर करवाई करावी. पण जर ते काहीच कारवाई करत नाहीत तर त्यांनाही या खंडणीचा वाटा जातो असे म्हणावे लागेल.
राज्यातील व्यावसायिकाना संरक्षण देणे हे गृहमंत्र्यांचे काम असते. पण त्याऐवजी जर त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जाते तर गोव्यात जंगल राज चालू आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.